चंद्रपूर: १६ सप्टेंबर ( सुनील तायडे )
पोलीस अधिक्षकांकडे तक्रार.,पीडितेला जीवे मारण्याची धमकी
ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून सुरू करण्यात आलेले बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेकनोलॉजी,बल्लारपूर (बीआयटी) सद्या चांगलेच चर्चेत आहे.येथील एका महिला कर्मचारीने 2 प्रचार्यांविरुद्ध विनयभंग केल्या प्रकरणी पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केल्याने,शैक्षणिक वर्तुळात हा विषय चर्चेचा ठरला आहे.
मायनिंग इंजिनियरिंग विभागाच्या प्रमुख जयश्री कोरमोरे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारी नुसार प्राचार्य श्रीकांत गोजे व प्राचार्य रजनीकांत मिश्रा यांनी 6 ऑक्टोबर ला अभद्र व्यवहार करीत जयश्री यांचा लॅपटॉप फोडण्याचा प्रयत्न केला.याच वेळी या दोघांनी हात पकडून ओढाताण केली.यात जयश्रीच्या हाताला जखम झाली व तिचे कपडे फाडले गेले.घाबरलेल्या जयश्रीने बाहेर निघून संस्था चालकांना सूचना केली पण ते बैठकीत व्यस्त होते.जयश्रीने बल्लारपूर पोलीस स्टेशन गाठले,तक्रार केली पण त्याची दखल घेतली नाही.पोलिसांनी दोन्ही प्रचार्यांना चौकशी करिता बोलावले.पण नंतर पोलीस चहा पाण्यात रमले.
जयश्री मागील 6 वर्षांपासून कार्यरत आहे.तेथे काम करणारा शैलेश हा देखील जयश्रीच्या पाळतीवर असतो व जयश्रीने प्रचार्यांसोबत दुष्कृत्य करावे,यासाठी तो प्रयत्नशील असतो,असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.पोलीस अधीक्षक यावर काय कारवाई करतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
*जीवे मारण्याची धमकी…*
जयश्रीच्या तक्रारी नुसार तिला अनेकवेळा जीवे मारण्याची धमकी प्राचार्यांनी दिली.हेच नाही तर बिहार व झारखंड येथील विद्यार्थ्यांना देशी कट्टा,पिस्तूल पण आणावयास सांगितले.यासाठी जयश्रीने अश्या विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर द्यावे असेही ही प्रयत्न केले,असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.हा सारथी असोसिएशनचा कारनामा-संजय वासाडे
मागील काही महिन्यापासून येथे कार्यरत असलेल्या कर्मचा-यांचे सारथी असोसिएशन व्यवस्थापनाविरूध्द चुकीच्या तक्रारी करीत आहे. त्यांचा उद्देश पुर्ण होत नसल्याने त्यांनी हे कथित प्रकरण घडवून आणले.मुळात ही घटना इंटरनेटच्या जोडणीबाबत आरोप-प्रत्यारोप करण्यावरून घडली. त्यावेळी प्राचार्यांनी जयश्रीला इतर लोकांसमोर सुनावले.त्यामुळे ती अपमानीत झाली.याघटनेची तक्रार व्यवस्थापनाकडे जयश्रीने दिल्यानंतर तिने आणखी एक तक्रार पोलिसांना दिली. पण या दोन्ही तक्रारीमध्ये
नमूद करण्यात आलेले विषय कुठेही जुळत नाही.हे संपुर्ण प्रकरण सारथी असोसिएशनने घडवून आणले आहे,त्यामुळे त्यात तथ्य नाही, असे बिआयटीचे संचालक संजय वासाडे यांनी सांगितले.
सुनील तायडे. संपादक. ९४२२१४००४५