मोठी बातमी : विक्रीपत्र व करारनामे नियमाकुल करून घेता येणार; पण ही आहे मुदत

654

चंद्रपुर: नोटरी केलेले अथवा न केलेले विक्रीपत्र व करारनामे नियमाकुल करून घेता येणार

चंद्रपुर, दि. 16 (प्रतिनिधी): महाराष्ट्र सरकारने मुद्रांक शुल्क व दंड सवलत “अभय योजना 2023” लागू केली आहे. ही योजना 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 आणि 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 अशा दोन टप्प्यात लागू केलेली आहे.

या योजनेनुसार,

  • 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधित निष्पादीत झालेल्या दस्तऐवजाचे संदर्भात,

    • पहला टप्पा: दि. 01.12.2023 ते दि. 31.01.2024 या कालावधीत अर्ज सादर केल्यास,
      • रु.1 ते रु.1 लाख इतक्या फरकाचे रक्कमेसाठी मुद्रांक शुल्क व दंडामध्ये 100% माफी दिली आहे.
      • रु.1 लाखापेक्षा जास्त मुद्रांक शुल्क 50% माफ व दंड 100% माफ केला आहे.
    • दुसरा टप्पा: दि. 01.02.2024 ते दि. 31.03.2024 या कालावधीत अर्ज सादर केल्यास,
      • रु.1 ते रु.1 लाख इतक्या फरकाचे रक्कमेसाठी मुद्रांक शुल्क 40% व दंडामध्ये 80% माफी दिली आहे.
      • रु.1 लाखापेक्षा जास्तचे प्रकरणात मुद्रांक शुल्क 40% माफ व दंड 70% माफ केला आहे.
  • 1 जानेवारी 2001 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधित निष्पादीत झालेल्या दस्तऐवजाचे संदर्भात,

    • पहला टप्पा: दि. 01.12.2023 ते दि. 31.01.2024 या कालावधीत अर्ज सादर केल्यास,
      • अ.रु.1 ते रु.25 कोटी इतक्या फरकाचे रक्कमेसाठी मुद्रांक शुल्क 25% व दंडाची रक्कम 25 लाखापेक्षा कमी असल्यास 90% माफ व दंडाची रक्कम रु.25 लाखापेक्षा जास्त असल्यास केवळ रु.25 लाख भरणे व त्यापुढील रकमेस सवलत.
      • बा.रु.25 कोटीपुढील जास्त असलेल्या- मुद्रांक शुल्क फरकाचे मुद्रांक शुल्कामध्ये 20% सवलत व दंडामध्ये रु.1 कोटी फका भरावयाचे व पुढील रकमेसाठी सवलत.
    • दुसरा टप्पा: दि. 01.02.2024 ते दि. 31.03.2024 या कालावधीत अर्ज सादर केल्यास,
      • अ.रु.1 ते रु.25 कोटी इतक्या फरकाचे रकमेसाठी मुद्रांक शुल्क 20% सवलत व दंडामध्ये
        1. दंडाची रक्कम रु.50 लाखांपेक्षा कमी असल्यास 80% माफी आणि जर
        2. दंडाची रक्कम रु.25 लाखापेक्षा जास्त असल्यास केवळ रु.50 लाख भरणे व त्यपुढील रकमेरा सवलत
      • ब) रु.25 कोटीपेक्षा जास्त असलेल्या मुद्रांक शुल्क फरकाचे रकमेसाठी मुद्रांक शुल्कामध्ये 10% सवलत दंड जास्तीत जास्त रु.2 कोटी भरावा लागेल व त्यापुढील रकमेस सवलत.

या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी अंकिता तांदळे यांनी केले आहे.